पुणे – करोनाच्या (corona) संकटामुळे आषाढीच्या पायी वारीला (Ashadhi Wari) खंड पडलेला होता. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता करोना (corona) आवाक्यात आलाय, म्हणूनच शासनाने गुढीपाडव्यापासून सर्व निर्बंध हटवले. त्यामुळे पुन्हा एकदा भाविक आपल्या लाडक्या विठूरायाची भेट घेण्यासाठी पंढरपूरला (pandharpur) जाणार आहेत.
यंदा पायी वारी (Pandharpur Wari) निघणार असून, तब्बल दोन वर्षानंतर आषाढी एकादशीनिमित्त पुण्यात पालखी सोहळा (Palkhi Ceremony) रंगणार आहे.
10 जुलै रोजी आषाढी एकादशी असून जून महिन्यापासूनच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम (Saint Tukaram) महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होते.
20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या (Tukaram Maharaj) पालखीचं पंढरपूरकडे (Pandharpur) होणार प्रस्थान होणार आहे.
9 जूलैला वाखरी तळावर पालखी पोहोचणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे यंदा वारी सोहळा उत्साहात होणार आहे.
करोनाच्या काळात लावलेल्या निर्बंधामुळे लोकांच्या वारकऱ्यांच्या मनासारखी वारी झाली नव्हती. पण मागच्या काही दिवसांपासून
करोनाचं सावट कमी झाल्याने निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर राज्य सरकारकडून पायी वारीला परवानगी मिळालेली आहे.
यंदा 20 जूनला संत तुकाराम महाराजांची पालकी पंढरपूरकडे रवाना होईल. तर नऊ जुलैला पालखी वाखरी तळावर
पोहणार असल्याची माहिती वेळापत्रकात दिली आहे. त्यामुळे विशेष म्हणजे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
दरम्यान, काही दिवसानुर्वी या सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या होत्या.
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी निर्धारीत वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.